पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि दौंड तालुक्यात गेले 3 दिवस शेतकरी एल्गार सुरू होता. उसाला कमी दर मिळत होता म्हणून शेतकऱ्यांनी 5 सप्टेंबर पर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
काल नागरगाव (ता. शिरूर)येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेत कोंडी फुटली.गुऱ्हाळमालक एकनाथ शेलार यांनी पुढाकार घेतला यावर्षी गुऱ्हाळाला येणाऱ्या ऊसाला ₹4300 प्रति टन दर देणार असल्याची घोषणा केली उपस्थित शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि शेलार यांचा सत्कार केला दौंड तालुक्यात 700 गुऱ्हाळे आहेत. काही दिवसांपूर्वी FDA ने 17 लाखांचा भेसळयुक्त गूळ जप्त केल्यावर गुऱ्हाळ चालकांनी एकत्र येऊन ऊस दर थेट ₹4000 वरून ₹3500 वर आणला होता, त्यामुळे शेतकरी संतापले होते. आता शेतकरी ₹4500 ते ₹5000 दर मागत आहेत. मांडवगण आणि पारगाव येथे पण सभा झाली, तिथे ₹5000 ची मागणी एकमुखाने केली आहे. म्हणजे हा ₹4300 चा दर हा पहिला तोडगा आहे, शेतकरी एकजुटीचा विजय मानला जातोय.