अशी आहे सध्या धरणाची परिस्थिती
👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली |
📅
25 June 2026 |
👁 457 Views
जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.28 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 34.40 टीएमसी असून सध्या 32.8% पाणी साठले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली. जिल्ह्यातील इतर धरणांची स्थितीही समाधानकारक आहे. कोयना धरणात 13.97 टीएमसी, धोम 3.77 टीएमसी, कन्हेर 3.34 टीएमसी, उरमोडी 3.13 टीएमसी तर राधानगरीत 1.84 टीएमसी पाणीसाठा आहे. अलमट्टी धरणात 21.41 टीएमसी पाणी असून त्याची क्षमता 123 टीएमसी आहे. सध्या वारणा धरणातून 200 क्युसेक, कोयनातून 525 क्युसेक, अलमट्टीतून 868 क्युसेक विसर्ग सुरू आहे. राधानगरी, तुळशी, कासारी धरणातूनही विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सांगलीतील आयर्विन पुलावरील पाणी पातळी 7.3 फूट नोंदवली गेली आहे. असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे