वारकरी हो आळंदीला येऊ नका -प्रशासन

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 06 July 2026 | 👁 264 Views
वारकरी हो आळंदीला येऊ नका -प्रशासन
इंद्रायणी नदीला महापूर! आळंदीतील चारही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांना 'आहात तिथेच थांबा'चे आवाहन.आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मावळ भागात आणि धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून पाणी सोडल्याने आळंदी येथील इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. आळंदी शहराला जोडणारे इंद्रायणीवरील चारही मुख्य पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरात प्रवेश करणे धोकादायक झाले आहे.नदीच्या दोन्ही घाटांवर पाणी शिरले आहे. नदीकाठच्या घरे, धर्मशाळा आणि वारकरी संस्थांमध्येही पाणी घुसले आहे. शनिमंदिर आणि सिद्धबेट परिसरातही पाणी आले आहे घाटावर आषाढी वारीसाठी लावलेल्या चेंजिंग रूम पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. दुकानदारांनी आपले साहित्य हलवले आहे. त्यामुळे सर्व वारकरी बंधू-भगिनी आणि पांडुरंगाच्या भक्तांना प्रशासनाकडून नम्र आवाहन करण्यात आले आहे की आपण आळंदीला येऊ नये.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |