राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी आणि काही जुन्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची चर्चा आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होऊ शकतात. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांना "ऑपरेशन टायगर" च्या यशाचे बक्षीस म्हणून मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळू शकते.राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये पुन्हा चर्चेत आहे. पंकजा मुंडे यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाऊ शकते अशीही चर्चा आहे.ओबीसी आणि पश्चिम महाराष्ट्राला प्रतिनिधित्व ओबीसी चेहरा म्हणून गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर सांगली जिल्ह्यातून सुहास बाबर यांच्या नावाची ही मंत्रिमंडळासाठी चर्चा सुरू आहे. या दोन नावांच्या चर्चांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.दुसरीकडे संजय राठोड आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदावरून हटवले जाऊ शकते अशी शक्यता आहे.याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मुख्यमंत्री आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या अंतिम चर्चेनंतरच यादी जाहीर होईल अशी शक्यता आहे . पण सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.
---