कार्यक्रमाच्या प्रारंभी दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. आर्थिक मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, "मोटेवाडीतील ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून सहा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण प्रसंगी बाधित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम आणि कदम कुटुंबीय समाजातील संकटग्रस्त नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देत आले आहेत. महाराष्ट्रात कुठेही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य दुर्घटना घडल्यास सामाजिक बांधिलकी जपत मदत करण्याची त्यांची परंपरा आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या माध्यमातूनही गरजू रुग्णांना सातत्याने वैद्यकीय मदत दिली जाते. भविष्यातही या बाधित कुटुंबीयांना आवश्यक ती मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू."
यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, "मोटेवाडीतील ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून सहा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण प्रसंगी बाधित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम आणि कदम कुटुंबीय समाजातील संकटग्रस्त नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देत आले आहेत. महाराष्ट्रात कुठेही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य दुर्घटना घडल्यास सामाजिक बांधिलकी जपत मदत करण्याची त्यांची परंपरा आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या माध्यमातूनही गरजू रुग्णांना सातत्याने वैद्यकीय मदत दिली जाते. भविष्यातही या बाधित कुटुंबीयांना आवश्यक ती मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू."
तसेच त्यांनी या मदतीसाठी आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठ आणि कदम कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमास जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, बिराप्पा शिंदे, भिमगोंडा पाटील, मोटेवाडीचे तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, नागेश मोटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्घटनेनंतर तातडीने मदतीसाठी पुढाकार घेऊन बाधित कुटुंबीयांना आर्थिक दिलासा दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि भारती विद्यापीठाचे आभार मानले. संकटाच्या काळात समाजाने एकजुटीने उभे राहून अशा कुटुंबांना आधार देणे हीच खरी मानवता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.