हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठी दिलेली शेवटची मुदत 30 जून रोजी संपली. पाच वेळा मुदतवाढ देऊनही नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने उदया , 1 जुलैपासून दंडात्मक कारवाई सुरू होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मंत्री सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत महाराष्ट्रात 1 कोटीपेक्षा जास्त बुकिंग दाखल झाली असून, त्यापैकी जवळपास 93 लाख गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही जवळपास 50 लाख गाड्या बाकी आहे.परिवहन आयुक्तांनी सांगितले की, वारंवार मुदतवाढ देऊनही लोक नंबर प्लेट बसवत नसल्याने 1 जुलैपासून ज्या वाहनांना HSRP बसवलेली नाही, अशा वाहनांवर ₹1,000 पर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी HSRP अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जुन्या वाहनांनाही HSRP बंधनकारक केली आहे. लोकांनी दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाही, त्यामुळे आता कारवाई अटळ आहे," असे सरनाईक यांनी सांगितले.