आचरा समुद्रकिनारी वादळी वाऱ्यामुळे रिसॉर्टचे नुकसान

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 26 June 2026 | 👁 100 Views
आचरा समुद्रकिनारी वादळी वाऱ्यामुळे रिसॉर्टचे नुकसान
आचरा येथील पिरावाडी समुद्रकिनारी सायंकाळी गेलेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील अनेक रिसॉर्टचे मोठे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे काही रिसॉर्टच्या पत्र्यांची उडाल्याने मालमत्तेचे नुकसान झाले असून पर्यटन व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य चालू केले होते. वादळी वाऱ्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्ट व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे.

या घटनेत श्रीमती शलाखा कांदळगावकर यांच्या रिसॉर्ट चे पूर्ण पत्रे उडून आतील किंमती सामान भिजून मोठे नुकसान झाले आहे. सुशमा कोयंडे , प्रफुल्ल भाबल आणि सायली सारंग यांच्या रिसॉर्टचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पत्रे उडून गेली असून मोठी किंमती वस्तूंची हानीही झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच आचरा ग्रामपंचायतीचे सरपंच जेरोन फर्नांडिस, ग्रामपंचायत अधिकारी पद्माकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, तन्वी जोशी, कोतवाल गिरीश घाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. संबंधितांचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |