परळी वैद्यनाथ शहर व मतदारसंघातील मराठा समाज बांधवांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करत, वैद्यनाथ मंदिर परिसरात नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून २८ गुंठे जागा खरेदी करून सुसज्ज मराठा भवन उभारणीसाठी नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून झालेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी उपस्थित मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे स्नेह सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक Chhatrapati Shivaji Maharaj यांना अभिप्रेत असलेली एकोप्याची संस्कृती आपण सर्वांनी जपली असल्याचे सांगण्यात आले. जात, धर्म, पंथ यांचा भेद न करता समाजकारणाच्या माध्यमातून सातत्याने जनसेवा केली असून, जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आपल्या कार्याची खरी ताकद असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
परळी शहरात उभारण्यात येणारे मराठा भवन हे संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल, तसेच समाजातील प्रत्येक गरजू बांधवांसाठी सर्वार्थाने उपयोगी पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विविध उपक्रमांचे केंद्र म्हणून हे भवन भविष्यात ओळखले जाईल, असेही यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले.
मराठा भवन उभारणीसाठी सातत्याने मागणी व पाठपुरावा करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे आमदार धनंजय मुंडे यांनी यावेळी विशेष अभिनंदन केले