आटपाडी तालुक्यातील गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्या बुधवारी व शनिवारी झरे परिसरामध्ये येत असतात व ग्राहकांना गॅस पुरवत असतात. अलीकडच्या काळामध्ये बुकिंग केल्याशिवाय किंवा ओटीपी सांगितल्याशिवाय गॅस मिळत नाही असा नियम असला तरी कामगार व काही खाजगी एजंट दडग्या रस्त्याने गॅस बुकिंग करून ओटीपी घेऊन गॅस घेतात व समोर च्या पार्टीला तिप्पट किमतीने म्हणजेच 2800 रुपयाला विकतात.
आजही गॅस सिलेंडरच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या जरी परिसरामध्ये आल्या होत्या. तर एक साठी ओलांडलेली वयोवृद्ध महिला गॅस घेण्यासाठी थांबली होती. तिचा मुलगा मयत असून सुनबाई मुंबई येथे राहते . तिच्या स्वतःजवळ ना मोबाईल ना आधार कार्ड अशी कोणतीही कागदपत्रे नव्हती . पण त्यामुळे वयोवृद्ध महिलेचा गॅस संपला होता गॅस एजन्सीच्या कामगारांना ती हात जोडत होती विनंती करत होती की मला गॅस द्या माझ्या घरी कोणी नाही मी स्वतः एकटीच आहे चुलीवर स्वयंपाक करता येत नाही धुरामुळे डोळ्यातून पाणी येते माझं वय झालं आहे असे विनंती करत होते परंतु निर्भीड कामगारांना व मालकाला त्या वयोवृद्ध महिलेची दया आली नाही .
त्या वयोवृद्ध महिलेच्या डोळ्यांमध्ये पाणी उभा राहिले परंतु निर्भीड कामगारांना त्याचे काहीच वाटले नाही. निर्भीड काळजाचे कामगार व गॅस एजन्सी चे मालक यांनी त्या महिलेला सिलेंडर दिला नाही...
मात्र कुणाच्याही नावावर सिलेंडर खाजगी एजंटांना दिला जातो आणि ते खाजगी एजंट 2800 रुपये प्रमाणे सिलेंडरची विक्री करतात. हे कामगारांना व मालकांना चालते परंतु एका आपल्या आईच्या आजीच्या वयाच्या वयोवृद्ध महिलेला सिलेंडर दिला जात नाही हीच का गॅस सिलेंडर वाल्यांची माणुसकी.
कामगार व खाजगी एजंट 2800 रुपयाला गॅस विकतात हे गॅस एजन्सीच्या मालकाला चालते, परंतु एक वयोवृद्ध महिला विनंती करते तिला एखादा गॅस ॲडजेस्ट करून दिला जात नाही. म्हणजे गॅस एजन्सी मालकाकडे किंवा कामगाराकडे माणुसकी आहे की नाही याबाबत चर्चा नागरिकांत सुरू आहे.
खाजगी एजंटांकडून ग्राहकांची लूट केलेली गॅस कामगार व एजन्सी चे मालक यांना चालते पण ज्या महिलेचा मुलगा मयत आहे सुनबाई मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईला राहते ही वयोवृद्ध महिला एकटीच इथे राहते ती स्वयंपाक कशावर करणार याची थोडीफार तरी दया यायला हवी होती परंतु असं घडलं नाही.
यांना दया येते ती कोणाची जे खाजगी एजंट काळाबाजार करून कोणाच्याही नावावरती गॅस बुकिंग करून 2800 रुपये विक्री करतात त्याची दया या लोकांना येते म्हणजे आज काल या जगामध्ये माणुसकी जिवंत आहे की नाही हा गंभीर प्रश्न आहे.