आटपाडी : सध्या शाळेच्या सुट्ट्या संपत आले आहेत महा- सेवा केंद्रामध्ये उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला ,डोमासाईल, नॉन क्रिमिनल कागदपत्राची जुळवा जुळव करावी लागत असते. त्यासाठी अनेक दाखले जोडावे लागतात त्याचबरोबर सातबारा व खाते उतारा जोडावा लागतो .परंतु सध्या सातबारा काढण्याची साईट चालत नसल्याने सातबारा उपलब्ध होत नसल्याने पुढील प्रोसेस करण्यास विलंब लागत आहे .त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांची महा ई सेवा केंद्र समोर रांगाच्या रांगा लागत आहेत..
सातबारा व खाते उतारा ची साईट संध्याकाळी सहानंतर सुरू होते. त्यावेळेला महा ई सेवा केंद्र बंद असते. नागरिक ही आपआपल्या घरी असतात .त्यामुळे संध्याकाळी हेलपाटे मारायचे कुठे .हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
शाळा प्रवेशासाठी जातीचा, नॉन क्रिमिनल,, डोमासाईल ,उत्पंनाचा दाखला जोडवा लागतो पण दिवसा लाईट नसल्याने दाखले निघत नाहीत आणि संध्याकाळी महा ई सेवा केंद्र बंद असते तर संध्याकाळी सहानंतर साईट सुरू होते. त्यावेळेला महा ई सेवा केंद्र बंद असते .त्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करून दिवसा साईड सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांचे मूळ विद्यार्थ्याचं होत आहे.
जर विद्यार्थ्यांना वरील कागदपत्रे अभावी शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही. तर उद्रेक होण्याची शक्यता आहे .त्यामुळे संबंधित विभागाने सातबारा खाते उतारा व इतर कागदपत्रे काढण्यासाठी दिवसभर साईड सुरू ठेवावी अशी मागणी नागरिक व विद्यार्थ्यांच्या मधून होत आहे.
आणि जर विद्यार्थ्यांना जातीचा , उत्पन्न दाखले, नॉन क्रिमिनल असे दाखले नाही मिळाले तर त्यांना ऍडमिशन मिळणार नाही, आणि ऍडमिशन नाही मिळाले तर त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण वर्ष वाया जाणार. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्याकडून वि होणारा उद्रेक. आणि या उद्रेकाला शासन जबाबदार राहणार आहे अशी चर्चा विद्यार्थी वर्गातून होत आहे.
तरी या सर्व गोष्टीचा विचार करून जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला सातबारा नॉन क्रिमिनल हे दाखले मिळण्यासाठी दिवसा साईट सुरू ठेवावी अन्यथा भविष्यामध्ये विद्यार्थ्याकडून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.