सरपंच विजय सरगर यांच्या कार्यकाळात सरकारी योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचल्या - शिक्षक नेते अशोक पाटील
सोलापूर : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे अधिकारी म्हणून विजय सरगर यांनी आपल्या कार्यकाळात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना अनेक सरकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
विजय सरगर यांनी कार्यकाळात प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यावर विशेष भर दिला. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी त्यांनी विविध विभागांशी समन्वय साधून प्रभावी अंमलबजावणी केली. शेतकरी, महिला बचत गट, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच बेरोजगार युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गावोगावी पोहोचविण्याचे काम करण्यात आले.
त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता, तत्परता आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला. विविध सामाजिक संघटना व नागरिकांनीही विजय सरगर यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले असून, त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासात्मक उपक्रमांना गती मिळाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.