संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे ‘सकल हिंदू समाज’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदू समाजामध्ये एकता दृढ करणे, संस्कृतीचे जतन करणे आणि सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन चालण्याच्या उदात्त उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
संमेलनामध्ये धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक ऐक्य याबाबत प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या परंपरा, संस्कार आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी समाजाने एकत्रित राहण्याची गरज वक्त्यांनी अधोरेखित केली. धर्माभिमान जागवण्यासोबतच समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या संमेलनातून देण्यात आला.
हिंदू समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संस्कृती रक्षणासाठी सर्वांनी एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या यशस्वी आयोजनाबद्दल ‘सकल हिंदू समाज’च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि उपस्थित नागरिकांचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले