"200 ते 250 रुपयात पनीर कसे मिळते?" - तुकाराम मुंढे यांचा भेसळीबाबत इशारा
अन्नसुरक्षा आणि भेसळीच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे प्रशासक तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा नागरिकांना सावध केले आहे. "बाजारात 200 ते 250 रुपये किलोने मिळणारे पनीर हे खरे पनीर असूच शकत नाही" असे त्यांनी म्हटले आहे.मुंढे यांनी हिशोबच मांडला आपल्या विधानात त्यांनी पनीरच्या उत्पादन खर्चाचा ताळेबंद मांडला. 1 किलो पनीर बनवण्यासाठी 6 ते 7 लिटर दूध लागते. सध्या दूध 60 ते 70 रुपये लिटरने मिळते. त्यामुळे फक्त दुधाच खर्च 400 ते 450 रुपये होतो. याशिवाय प्रोसेसिंग, मजुरी, पॅकिंग, वाहतूक याचा खर्च वेगळा.त्यामुळे 200-250 रुपयात विकले जाणारे पनीर हे दुधापासून बनलेलेच नसून त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ असण्याची शक्यता आहे, असा दावा मुंढे यांनी केला.त्यांच्या म्हणण्यानुसार अशा स्वस्त पनीरमध्ये दुधाऐवजी पाम ऑईल, स्टार्च, स्किम मिल्क पावडर, डिटर्जंट आणि इतर घातक केमिकल्स मिसळले जाऊ शकतात. असे पनीर खाल्ल्याने आरोग्याला मोठा धोका आहे.
मुंढे यांनी नागरिकांना पनीर घेताना पुढील काळजी घेण्याचे आवाहन केले:
FSSAI मार्क पहा पॅकबंद पनीरवर FSSAI लायसन्स नंबर असणे अनिवार्य आहे.
पाणी टेस्ट करा -पनीरचा तुकडा गरम पाण्यात 10 मिनिटे उकळा. पाणी पांढरे झाले किंवा वर तेलाचा थर आला तर भेसळ आहे.
बिल घ्या - उघड्यावरील आणि बिलाशिवाय मिळणारे पनीर टाळा.