माळशिरस मातंग समाजाच्या उषाताई साठे या मजूर महिलेला गोळी झाडून संपवले आहे. आरोपीने जातीचा माज केला आणि एका गरीब अनुसूचित जातीच्या महिलेला क्रूरपणे संपवले आहे. राज्याला हादरून टाकणारी ही घटना आहे.दलितांच्या लेकीबद्दल सरकार किती उदासीन आहे. मिडियात दलितांच्या लेकीची बातमी नाही. मोठा शोध घेतल्यानंतर मला त्यांच माळखांबी गाव शोधण्यात यश आलं. कुटुंब भयभीत आहे. 10 वर्ष झालं हे कुटुंब त्या नराधम सचिन देशमुखकडे मजुरीचे काम करत होते. गावगुंड, सावकारी, जात आणि पैशाचा माज या बळावर एका दलित लेकीची हत्या केली. मी सरकारला मागणी करतो, दलित महिलेला न्याय देण्यासाठी नसरापुरच्या धर्तीवर 50 दिवसात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या उद्देशाने चांगला सरकारी वकील लावून तत्काळ न्याय दिला पाहिजे.
पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी व 50 लाखांची मदत करून 5 एकर जमीन देण्यात यावी. आरोपीची संपत्ती जप्त करावी, त्याने शस्त्र कुठून आणले, त्याच्या कटात आणखी कुणी सामील आहेत का याची एसआयटी मार्फत चौकशी करावी. पँथर दिपक भाऊ केदार यानी मागनी केली आहे