आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याकडे माळशिरस तालुक्यातील असंख्य भाविक भक्त दाखल"
👤 पिलीव प्रतिनिधी रघुनाथ देवकर |
📅
06 July 2026 |
👁 79 Views
सालाबादप्रमाणे आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व देहू येथून श्री संत तुकाराम महाराज यांच्या दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानास माळशिरस तालुक्यातील असंख्य भाविक भक्त ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात व जय जय विठ्ठल रखुमाईच्या नामघोषात असंख्य भाविक भक्त दाखल झाल्याचे समजते. आणि त्याप्रमाणे आषाढी वारीची चाहूल सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सर्व मार्गावरील ग्रामपंचायती, नगरपालिका यांचे कडूनही दिंडी सोहळ्याच्या आगमनाची जय्यत तयारी दिसून येत आहे. आरोग्य विभाग, वीज विभाग, सामान्य प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग, तरुण मंडळे, विविध संस्था यांचे कडून ही जोरात पालखी सोहळ्यांच्या स्वागताची तयारी होत असल्याचे दिसून येत असून जसजशी आषाढी एकादशी जवळ येईल त्याप्रमाणे जागोजागी भक्तिमय वातावरण तयार होऊ लागल्याचे दिसून आलेले आहे.