राजर्षी शाहू जयंतीला मंगळवेढ्यात पाणी हक्काचा एल्गार
आज राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा येथे कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी 34 वी पाणी संघर्ष परिषद उत्साहात संपन्न झाली. विशेषतः आटपाडी, सांगोले, मंगळवेढा व जत तालुक्यातील पाणी प्रश्नावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. या परिषदेला प्रा. शिवाजीराव काळुंगे सर, माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार विक्रमदादा सावंत, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव भाऊ नायकवडी,प्रा. डॉ. बाबुराव गुरव, प्रा. आर. एस. चोपडे, विश्वंभर बाबर सर, अॅड. सुभाष पाटील, अॅड. सरफराज बागवान, अॅड. भारत पवार, प्रा. दत्ताजीराव जाधव, सी. पी. गायकवाड, व्ही. एन. देशमुख, अॅड. बिराप्पा जाधव, तुकाराम बाबा महाराज यांच्यासह परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परिषदेतील प्रमुख मुद्दे:
1. कृष्णा खोऱ्यातील कायम दुष्काळी 13 तालुक्यांना हक्काचे पाणी मिळावे.
2. आटपाडी, सांगोले, मंगळवेढा, जत या तालुक्यांतील सिंचन प्रकल्पांना गती द्यावी.
3. टेंभू, म्हैसाळ, ताकारी योजनांचे रखडलेले काम पूर्ण करावे.
4. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी योजना राबवावी.
प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी धोरणांचा दाखला देत सरकारने दुष्काळग्रस्त भागाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. माजी आमदारांनीही एकमुखाने पाणी प्रश्नावर लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.34 वर्षांपासून सुरू असलेली ही पाणी संघर्ष परिषद दुष्काळी भागातील जनतेचा आवाज बनली आहे.