एकीकडे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिल माफीच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात अपुरा व अनियमित वीज पुरवठा करून शेतकरी व ग्रामीण जनतेच्या जीवनाशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. अन्यथा येत्या काळात याचे राजकीय व सामाजिक परिणाम सरकार आणि लोकप्रतिनिधींना भोगावे लागतील, असा संतप्त इशारा ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.