आटपाडी : सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र खरात यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचाचे सचिव सुरेश मोटे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या उद्देशाचे महत्त्व विशद केले. यावेळी स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण वाघमारे, नगराध्यक्ष उत्तम जाधव, जिल्हा परिषद बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, पंचायत समिती सभापती दत्तात्रय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष अनिल पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, डॉ. विनय पत्की आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सन्मान करून शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहन देणारे कार्य सातत्याने केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मा. राजेंद्र खरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी आईचे दुःखद निधन झाले असतानाही विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाची परंपरा खंडित होऊ न देता समाजहिताचे कार्य सुरू ठेवणे हे प्रेरणादायी असून इतरांनीही आदर्श घेण्यासारखे आहे. याबद्दल त्यांनी खरात यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पालकांनी संयोजकांचे विशेष कौतुक केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष धनंजय वाघमारे, शरद वाघमारे, विवेक सावंत, विलास धांडोरे, मारुती ढोबळे, सुरेश मोटे, नारायण जावीर, जनार्दन मोटे, विजय पवार, प्रा. उत्तम मोटे, दत्तात्रय चव्हाण, संतोष लांडगे, राजेश मोटे, सागर भोसले, मुकेश सवणे, रघुनाथ कांबळे, भीमराव कदम, जगन्नाथ हाडमोडे, प्रतिभा सावंत, शोभा धांडोरे,विटा चंद्रकांत कांबळे,बशीर भाई मुजावर, शरद घाडगे,आशद मुजावर, अँड.शहानवाज मुसा काजी,यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनार्दन मोटे यांनी प्रभावीपणे केले. शेवटी उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.