उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा
👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली |
📅
10 September 2026 |
👁 41 Views
MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी उरुण- ईश्वरपूर येथे विद्यार्थ्यांचा जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. हातात तिरंगा आणि मागण्यांचे फलक घेत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.मोर्चादरम्यान “MPSC विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे”, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व वेळेत राबवावी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.मोर्चामध्ये युवक-युवतींची मोठी उपस्थिती असल्याने परिसरात विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.